परिस्थिती कशीही असो मानवी मन चिंता करायचं सोडत नाही. स्वभावधर्म आहे तो, बदलणं अवघड आहे.
गेले कित्येक महिने आपण सगळेच या तणावाखाली आहोत की कधी हे संपेल, आप्तेष्टांना काही होईल का, झालं तर पुढे काय!!??...
एक मिनिटभर विचार करा, कोरोनापूर्वी ही आपल्याला काही नं काही विवंचना होतीच.. स्वरूप व तीव्रता वेगळी होती.
आत्ता त्याचा focus पूर्ण बदलून मुख्यतः तब्येत चांगली ठेवणं, समाजात वावरताना सांभाळून रहाणं, आणि आपला/जवळच्यांना गमावणं याची भीति, सुखासीन lifestyle, househelp नसणे, अंतिमतः घरकाम जास्त करावं लागणे ; अर्थाजनाचे मार्ग अवघड होणे, उद्योगधंदे बसणे इ.
आणि या सगळ्याची अशाश्वतता हा आहे..
ताण हलका करण्यासाठी थोडंसं defocusing हे तंत्र वापरूया.. त्यात नकारात्मक गोष्टी जसं की househelp नाही म्हणून घरकाम जास्त, कोरोना झाला तर काय ही भीति, आर्थिक अडचणी हे विचारांमध्ये आणायचंच नाही..
फोकस फक्त तब्येतीस जपून रहाणे, व्यायाम शरीरासाठी आणि प्राणायाम मनासाठी करणे. कमीत कमी बाहेर पडणे इ.
जेव्हा आपण सगळ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही, किंबहुना ही अशी परिस्थिती आहे की एकट्या माणसाच्या हाताबाहेर आहे हे सगळं सावरणं, तेव्हा आपण आपलं मनोबल वाढवणं आणि शक्य तितकी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे.
अतिश्रमाने (मानसिक, शारिरीक) कधीतरी असं वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यातून सावरून परत उभं रहाणं ही सध्याची गरज आहे.
मनोबल वाढवा, सुरक्षित रहा.

No comments:
Post a Comment