Friday, May 8, 2020

कोरोना_तणाव : 2

 लाॅकडाऊन चे आता जवळ जवळ 45 दिवस झाले आहेत. मला 2 मुली वय वर्षे 8 व 3; अनन्या व अस्मि अनुक्रमे.
 सुरूवातीला सुट्टी लागली, परीक्षा रद्द या आनंदात वेळ छान गेला.
पण मग लगेच 4 दिवसात या सुट्टीत करायचं तरी काय हा प्रश्न पडलाच! 
मग घेतलं दोघींना हाताशी.. एक दिवस दोघींनाही पोळी लाटायला दिली. बसल्या लाटत. अनन्या रोज बघायची मला लाटताना, तिने अलगद लाटायला सुरू केलं. अस्मि ने जोराजोरात लाटलं आणि त्याचा अगदी पापड झाला.. दोघींनी दिलेला जोर कमी जास्त झाला आणि पोळ्या काही जमेनात.. मग अनन्याची चिडचिड ..आई तुला कशी गोल येते लाटता, मला कधी येईल!!
अस्मि निवांत 15 मिनिटे एक छोटुसा गोळा घेऊन लाटत राहिली ..कधी त्या गोळ्याचा उंदिरमामा केला, कधी फूल केलं.. कधी बाॅल केला...

सध्याच्या तणावजन्य परिस्थितीचही तसंच आहे नाही का... ताण सगळ्यांनाच आहे:
-कोरोना समूळ कधी नष्ट होईल?
-कोरोनावर लस तरी कधी येईल?
-कोरोना जवळपास कुणाला झाला तर मग काय?
-आपल्याला काही झालं तर घरच्यांचं कसं होईल?
-Lockdown असंच वाढत राहिलं तर ऑफिसेस, शैक्षणिक संस्था, उद्योगधंदे कधी पर्यंत बंद रहातील आणि आपलं किती नुकसान होईल?

या सततच्या ताणाखाली सगळे वावरतोय आपण.. काही जण त्यातून मार्ग शोधत आहेत.. सलग वेळ मिळतोय तर एखादी कला- गायन, नृत्य, पाककला; एखादा छंद जोपासत आहेत-वाचन, बागकाम, चित्र काढणे, रंगवणे इ.

काही लोकांना या सगळ्याचा इतका ताण येतोय की त्यांची चिडचिड वाढली आहे.
ताण जेव्हा जास्त होतो तेव्हा तो अशा प्रकारे बाहेर पडतो:
•राग
•भीति
•काळजी
•असुरक्षितता
•कशातच मन न रमणे- उदासिनता.

Lockdownच्या 45 व्या दिवशी काहींनी ही दिनचर्या स्वीकारली आहे.
काहींना हे अजूनही जड जात आहे. 
याच मुख्य कारण: 
•आपलं ध्येय आता फक्त कोरोनापासून सांभाळून रहाणं हे आहे. 
•ज्या गोष्टींची आपल्याला नकळत सवय झाली होती त्या आता सहजासहजी मिळत नाहीयेत.
•आर्थिक अडचणी- काहींच्या नोकरीची टांगती तलवार आहे, काहींचे उद्योग ठप्प आहेत. हातावर पोट असणारे तर फारच कठीण दिवस बघत आहेत.
•अशाश्वतता- कधी संपणार सगळं, रोज उठून आकडा किती झाला, आपल्या भागातला किती झाला.
•असहाय्यता- कुणाकडेच याची उत्तरे नाहीत त्यामुळे हतबल वाटतं.

मनात इतके सगळे विचार आणि काळजी असतात ते बाहेर पडतात:
•चिडचिड
•रडणे
•अति खाणे किंवा उपासमार करून घेणे
•कुणाशी संपर्क साधणे बंद करणे.

मानवी मन कुठलीही नवी -चांगली ,वाईट गोष्ट समोर आली तर ठराविक टप्प्यांमधून त्याचा स्वीकार करत जातं. ती घटना जर नकारात्मक असेल तर हे टप्पे लांबत जातात.
- Denial: स्वीकार न करणे
-Anger: राग येणे
- Bargaining: चल काहीतरी निघेल मार्ग, आज नाही तर उद्या.
-Depression: हतबलता.. 
- Acceptance: आहे ती परिस्थिती स्वीकारणे व त्यानुसार दिनचर्या ठरवणे.

काही लोकं पटापट हे टप्पे पार करतात आणि काही लोक मध्येच बराच वेळ रेंगाळतात.
हे टप्पे कमी त्रासदायक कसे करावेत हे बघुया पुढील भागात.

घरी रहा, सुरक्षित रहा, संपर्कात रहा.





8 comments:

  1. छान मनो विश्लेषण

    ReplyDelete
  2. छान सगळ्यांना रुचेल अशा हलक्या फुलक्या भाषेत लिहीले आहे.

    ReplyDelete
  3. Wow ma'am ...it's creating interest in reading

    ReplyDelete

पावसाळा..तब्येत सांभाळा!

जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हम...